Thursday 4 August 2016

बारामती बनले शैक्षणिक हब !!

                          बारामती बनले "Educational Hub"

       पुण्यापाठोपाठ बारामती हे एक नवीन शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास आले आहे. शिशु वर्गापासून पदव्युत्तर शिक्षणाची चांगली सोय बारामती मध्ये झाली आहे. बारामती शहरात तब्बल ४० हजाराहून अधिक लोकसंख्या विद्यार्थ्यांची आहे. 


        उत्तम हवामान, निवास व भोजनाची चांगली सोय, वसतिगृहांची उत्तम सुविधा व चांगले शैक्षणिक वातावरण, संगणक व इंटरनेटची उत्तम उपलब्धता, प्रशिक्षित शिक्षक वर्ग, या बाबींमुळे राज्यासह देशाच्याही अनेक भागातून मुले शिक्षणासाठी आता बारामतीमधे येऊ लागली आहेत. 

   
     
            विद्या प्रतिष्ठान, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, शारदानगर शैक्षणिक संकुल, शिवनगर विद्याप्रसारक मंडळ यासारख्या संस्थांसह इतरही काही शैक्षणिक संस्थांकडून शिक्षणाची नवनवीन दलाने उपलब्ध होत आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. शरद पवारसाहेब, मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया ताई सुळे, राजेंद्र पवार आदींनी बारामतीत शिक्षणाची चळवळ वाढीस लागावी या हेतूने जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि याचा सकारात्मक परिणाम झाला आहे.


Tuesday 2 August 2016

श्री क्षेत्र कन्हेरी, बारामती

                                        श्री क्षेत्र कन्हेरी


     


समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रीयन तरुणांमध्ये बलोपासनेची आवड निर्माण करण्यासाठी अनेक हनुमान मंदिरे उभारली त्यापैकी कन्हेरीचे मारुती मंदिर आहे असे महटले जाते. हरीभक्त पारायण काळे महाराज यांची ती कर्मभूमी त्यांनी कान्हेरी मारुती मंदिरात अखंड वीणा वादन व "ओम नमो भागवते वासुदेवाय" या मंत्राची सुरवात केली आहे, आजपर्यंत ती परंपरा पुढे चालवली जाते. काळे महाराजांनी कीर्तनकार निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले होते तेथील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी सोनापंत दांडेकर येत असत. काळे महाराजांच्या वास्तव्याने कान्हेरीचे मारुती देवस्थान जागृत आहे. बारामतीच्या पवार कुटुंबाचे ते श्रद्धास्थान असून डॉ.आप्पासाहेब पवार यांनी जन्म गावाचे ऋण फेडण्यासाठी हनुमान देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राचा विकास झाला आहे. त्याठिकाणी सर्वधर्म ग्रंथालयाची स्थापना देखील ट्रस्ट माध्यमातून करण्यांत आली आहे. 

पंचक्रोशीतील गोर गरीब मुला मुलींचे विवाह कमी खर्चात व्हावेत या करिता ट्रस्टच्या वतीने एक मंगल कार्यालय सुरु करण्यात आले आहे. काळे महाराजांचा अध्यात्मिक वारसा पुढे चालवण्यासाठी अप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कान्हेरी संदेश नावाचे नियतकालिक ह.भ.प सरलाताई बाबर यांच्या संपादनाखाली सुरु करण्यात आले होते. अध्यात्मिक विचाराबरोबर ग्रामीण भागातील नवोदित कवी साहित्यिक यांना प्रोत्साहन देण्याचे कार्यही सुरु होते.